शनिवार, २० जून, २०१५

''तांड्यावरल्या परचाराची गोष्ट ''

''तांड्यावरल्या परचाराची गोष्ट ''
साधारणतः 20 की मी चा दाट
झाडाझुडपांनी वेढलेला घाट. आणि त्या घाटात वसलेल शेआठशे लोकसंखेचा तांडा. त्या विधानसभा मतदारसंघातील ते अगदी शेवटच नि दुर्गम भागातल ते गाव.घाट रस्त्याच्या मध्यातुनच तांड्यावर जायला फाटा फुटतो. बैलगाडी कशीबशी वाट काढू
शकेल अशा खडक,दगड धोंड्याच्या रस्त्यावरून आज मतांची भिक
मागण्यासाठी डस्टर,इनोव्हा,तवेरा,स्कार्पियो,क्र
ुजर, जिपा अशा गाड्यांचा ताफा तांड्यावर पोचला.
दिवसभर गुरं ढोरं चरुन आता माणसं आपापल्या दारि तांड्यावर परतत होती. गावच्या अर्धवट अवस्थेत उभ्या वेशीजवळ गाड्यांचा ताफा थांबला,उमेदवारासह कार्यकर्ते गाडीतुन
उतरले .लागलीच याचे-त्याचे पाय धरणीला सुरवात
झाली.डोक्यावर पदर घेतलेल्या बाया बापड्या कुडाच्या घराबाहेर तांदूळेतर
धान्य पाखडीत बसलेल्या, मोठ््या कुतुहलाने त्या उमेदवार कार्यकर्ते
त्यांच्या घोषणा, हात जोडण बघत होत्या लोक आपले पाय पडताहेत याच
त्यांना आश्चर्य वाटत असावं..काहि जणी चुल पेटवत तर
काही झाडझुड करत होत्या.
गावातील पुरुष मंडळी घाटातल्याच काही नापिक जमिनीवर दिवसभर घाम
गाळून जिवाचा आटापिटा करून
ति पिकवण्याची केवीलवाणी धडपड करून आले होते, थकुन भागून अंधार्या कुडात तर काही बाहेर अंधारात गप्पा मारत बसले. 
कोणी म्हातारे बाजेवर पहुडलेले तर
काही पारावरच्या गप्पांत दंग. मीडी,टॉप वर असलेल्या मुली चुंबळ डोक्यावर घेउन भांड्या भांड्याने
कुठल्या तरी झर्यातून पिण्याच पाणी वाहात होत्या.पोरं,युवक मंडळी चकाट्या पिटीत बसली तर
काही खेळण्यात दंग..... लाईटचा दूरपर्यंत खांब दिसत नव्हता.
आतापर्यंत बर्याच पक्षांच्या उमेदवारांची मतदान मागण्यासाठी इकडे चक्कर झालेली दिसत होती.
कारण, ज्या कुडाच्या घरावर
टिव्ही एंटीना नव्हता त्या कुडावर तर
राजकीय पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. ज्या चिमुकल्यांच्या हातात
उजळणी हवी होती, त्यांच्या हातात
''उमेदवारांचे हॅण्डआउट'' दिसत होती.ज्या तरुणांच्या हातात अधुनिक
तंञज्ञान हवे होते आणि स्वयंपूर्ण शिक्षण हवे होते, त्या तरुणांच्या हातात
आणि डोक्यात राजकीय पक्षांच्या टोप्या,झेंडे दिसत
होते.जी माय भाकरी थापत होती तिच्या गळ्यात अलंकारा एवजी पक्षाच्या निशाणीची माळ दिसत
होती . ''............... या निशाणीवरच बटन दाबा'' हे बिंबवण्यात उमेदवाराबरोबर कार्यकर्ते व्यस्त होते.
ज्यांनी उमेदवाराकडे विज, पाणी, रस्ते,शीक्षण
इ सुविधा मागायच्या सोडून ते त्याच कुटट् अंधारात
पैशाची मागणी करत होते,
आणि ''हो नक्की उद्याच पाठवून देतो फक्त लक्ष असु
द्या''''अशी मान डोलवून उमेदवार आपले मत पक्के करून पुढे सरकत
होते.ज्या युवकांच्या तोंडात राष्ट्रगीताची गरज होती त्यांच्या तोंडातून राजकीय पक्षांच्या घोषणा अव्याहत
पणे बाहेर पडत होत्या. तांड्यावरच्या त्या अंधारात अंधारात मोबाईल च्या टॉर्च च्या उजेडात उमेदवार,कार्यकर्ते मत माघत फिरत होते. माय
माऊली चिमणीच्या उजेडात भाकरी थापत बसलि होती.
एका उमेदवाराचा प्रसिद्धी प्रमुख(PRO) म्हणुन घेण्यात माझा मलाच संकोच वाटत होता.
उमेदवारासह गाड्यांचा ताफा परत फीरला, गाड्यांच्या उजेडात
आम्ही त्या घनदाट जंगलात तांड्यापासुन कशीबशी वाट काढली होती. मात्र ते तांडेकरी जगत असलेल्या रोजच्या स्थितीतून कशी वाट काढतील? त्यांना याची गरज वाटत
नसेल का? असंख्य विचार मनाभोवती फिरत होते.
निरागस तांडेकरी मात्र रोज रोज त्याच नेहमीच्या दिनचर्ये
प्रमाणे जगत होते,त्यांना बाहेरच्या जगाचा मागमुसही नव्हता.
लोकशाहीत वाढणार्या त्या तांड्याच जणु काही जगच वेगळ
होत. आपल्या सोयी,सुवीधांची,
हक्कांची जाणीवही त्यांना नव्हती.त्यांच्या याच अजाणते पणाचा फायदा गेली कित्येक वर्षे हे
पुढारी घेत आलेत....
घाट उतरत असताना राज्य सरकारची एक पाटी दिसली ''जंगली श्वापदांचा वावर,''कृपया सावध
राहा'' तांडेकर्यांच तिथल्या चिमुकल्यांच अप्रुप वाटल.
त्या दिवशीची बातमी न लिहिताच
मी विचारात पडलो. गेली 54 वर्षे महाराष्ट्रात असे अनेक
तांडे विकास उदयाच्या प्रतिक्षेत असतील. या मतदानानंतर
तरी पालटेल का ही तांड्यावरच्या प्रचाराची गोष्ट ???????
प्रिय ...,
मा बळीराजा(मराठवाडा)
                        गेल्या काही वर्षापासून आपला मराठवाडा दुष्काळी सावटात जगत आहे. यंदा नाही पण पुढल्या वर्षी तरी निसर्ग आपल्यावर 'किरपा करील' ह्या आशेने बळीराजा तू चातका प्रमाणे अच्छे दिनाची वाट पाहतो आहे… आज २०१५ उजाडले तरी तुझ्या आत्महत्त्या थांबतील असा समाधानकारक पाउस पडला नाही. परिणामी आत्म्हत्त्यांचा डोंगर अधिकाधिक उंच होत आहे म्हणूनच आज तुला अनवधानाने पत्र लिहितो आहे.
बळीराजा,सकाळी उठल्या नंतर शहरातला प्रत्येक व्यक्ती आधी दार उघडून पेपर हातात घेतो. चहाचा एक एक घोट रिचवत तो बातम्या वाचू लागतो,
कर्जबाजारी शेतकर्याची आत्महत्त्या,
मराठवाड्याला दुष्काळग्रस्त जाहीर जाहीर करा-विरोधकांची मागणी,
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत,
बीड जिल्ह्यात ३ शेतकर्यानि मृत्यूला कवटाळले,
कापसाला योग्य हमीभाव द्यावा शेतकरी संघटनेची मागणी.
मराठवाड्यात चारा छावण्यांचे राजकारण............................................!
हे आणि असे कित्तेक मथळे तो वाचतो, मनाला वाईट वाटत, काही काळ हळहळतो ,शोक व्यक्त करतो तितक्यात चहा संपतो आणि तो पेपरची उघडलेली घडी बंद करून निघून जातो. हा त्याचा रोजचाच दिनक्रम आणि हो बळीराजा, हा त्याचाच नाही तर इथले राजकारणी,लेखक,कामगार,शासकीय अधिकारी -कर्मचारी, खत विक्रेते, आणि इथल्या धडधाकट तरुणांचाही असाच दिनक्रम.बळीराजा तू तिकडे जीवाच रान कर ओढ ताण करून शेती पिकव आम्हाला धान्य पुरव, आम्हाला परवडेल त्या भावात आम्ही धान्य घेऊ,मिळालेला गहू आई निवडून आणेल आम्ही त्या भाकऱ्या मज्जा मारत खाऊ. यामागचे कष्ट आम्हाला काय कळणार???तुला तुझा खर्च मिळाला काय आणि हमीभाव नाही काय ,कितीही आत्महत्त्या झाल्या आम्हाला कसलच सोयर सुतक नाही.हे आजच वास्तव.
एखाद्या खेड्यात एखाद्या शेतकरी बांधवाने आत्महत्त्या केली कि मग तिथला स्थानिक प्रतिनिधी वृत्तपत्र कार्यालयात बातमी पाठ्वतो,कार्यालयात संपादक ती बातमी रंगवून लावतो दुसर्या दिवशी सगळ जग ते वाचत आणि नंतर ते वृत्तपत्र रद्दीत जमा होत. गावचा तलाठी पंचनामा करतो काही दिवसांनी त्या शेतकऱ्याच्या घरी लाख दोन लाख रुपये येउन पडता. राजकारण्यांना पुळका येतो तेही काहीशी मदत करून जगभर मदतीचे फोटो उधळून likes मिळवतात. नंतर त्यांच्याकडे कोणीही फिरकत नाही. आजच्या या परिस्थितीला सरकारची इच्छाशक्ती कारणीभूत आहे, विर्रोधकांच आर्थकारण, तरुणांचा निष्काळजीपणा(आम्हाला सगळ आयत मिळतंय म्हणून),अधिकार्यांचा हुजुरेगीरीपणा,तुम्ही आम्ही सगळेच कारणीभूत आहोत.
बळीराजा, अस हे तुझ जगण्यातल वास्तव. मराठवाड्याच हे वास्तव तर आता अंगवळनीच पडलय, मराठवाड्याची जलधारा नाथसागरात पाण्याचा अभाव आहेच त्यात पाणी प्रश्न हा कळीचा मुद्दा आहे. कालच गावच्या आठवडी बाजारात गेलो होतो. चारा नसल्यामुळे पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवलेली गुर तू डोळ्यावर कातडी ओढून कमी भावात नाईलाजाने खाटकाच्या स्वाधीन करत होतास, हुंदके देत देत बैलाचा कासरा खाटिकाच्या हाती सोपवत होता. जानेवारीतच हि परिस्थी तर पुढे काय ???????हा आजचाच प्रश्न नव्हे हा मराठवाड्याला पडलेला कायमचाच प्रश्न आहे.
बळीराजा यावर कायमस्वरूपी तोडगा मात्र कोणीच काढत नाही. पण तू खचून जाऊ नकोस, निसर्ग नक्कीच तुझ्याबरोबर आहे. मराठवाडा नक्कीच दुष्काळ मुक्त होईल. आवघ्या जगाचा पोशिंदा तू लाख वादळे आली,लाख दुष्काळ आली तरी त्याच्यावर पाय ठेवून उभा राहणारा आहेस लक्षात ठेव.
बळीराजा, हे पत्र वाचत असलेला माझा प्रत्येक मित्र तुझ्या सोबत आहे . आम्ही तरुण वर्ग नक्कीच पेट्रोल, वीज, पाण्याची बचत करू. झाडे लावू. सृष्टीचक्र पूर्ववत होण्यासाठी हातभार लावू झालच तर व्यापार्यांपेक्षा थेट तुझ्याकडूनच धान्य , भाजीपाला विकत घेऊ.
पण मायबापा तू आत्महत्त्या करू नकोस……. !
                                                                                             तुला नेहमीच त्रास देणारा
                                                                                                        एक युवक
                                                                                               मयुर गोपीचंद गव्हाणे.

शुक्रवार, १४ मार्च, २०१४

केजरी‘वॉल

                                        भय्या केजरी‘वॉल’ गिरती क्यु नही?गिरेगी कैसे? अंबुजा सिमेंट से जो बनी है









लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बुधवारी मुंबई दौ-यावर आलेल्या अरविंद केजरीवाल यांनी नरिमन पॉइंट इथं फंड मॅनेजर आणि स्टॉक ब्रोकर्सशी चर्चा केली. तेव्हा, अंबुजा सिमेंटचे माजी व्यवस्थापकीय संचालक अनिल सिंघवी यांनी त्यांच्यापुढे दोन पर्याय ठेवले होते. पंतप्रधानपदासाठी तुम्ही भाजप नेते नरेंद्र मोदींना निवडाल, की बसप नेत्या मायावतींना पसंती द्याल?, असा मार्मिक प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर, आधी काहीच न बोलणा-या केजरींनी शेवटी मोदींचं नाव घेतल्याचं समजतं.

लोकसभा निवडणुकीच्या निकालात कुठल्याच आघाडीला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, त्रिशंकू अवस्था निर्माण होईल, असं मत केजरीवाल यांनी गुंतवणूकदारांशी चर्चेदरम्यान व्यक्त केलं. त्याचाच आधार घेऊन, अशा परिस्थितीत देशाचा पंतप्रधान म्हणून तुम्ही कुणाला कौल द्याल, अशी विचारणा अनिल सिंघवींनी केली आणि केजरी काहीसे गोंधळले. मायावती की मोदी हे दोन पर्याय त्यांच्यापुढे ठेवण्यात आले होते. सुरुवातीला थेट उत्तर देण्यास त्यांनी बरीच टाळाटाळ केली. या दोघांपैकी कुणालाच निवडणार नाही, असं त्यांनी अगदी ठामपणे सांगितलं. पण नंतर त्यांनी मोदींना झुकतं माप दिल्याचं सिंघवी म्हणाले.

लोकसभा त्रिशंकू आहे, पण पंतप्रधान तर निवडावाच लागणार आहे, अशा परिस्थितीत काय करणार?, या प्रश्नावर केजरीवाल यांनी आपलं मत मोदींच्या पारड्यात टाकल्याची माहिती अनिल सिंघवी यांनी दिली. माझ्यावर उद्या बंदूक रोखली गेली, तरच मी मोदींना निवडेन, असा पवित्रा केजरींनी घेतला. पण नंतर, अगदीच नाइलाज असल्यास आपण मोदींचा पर्याय निवडू, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. या निवडीचं कुठलंही कारण त्यांनी दिलं नाही.

मंगळवार, २८ जानेवारी, २०१४

ऑस्कर

ऑस्कर 

            
                       जगात सिनेसृष्टीतील विशेषतः हॉलीवूड मधील सर्वात प्रसिद्ध पुरस्कार म्हणून ऑस्करला अनन्यसाधारण महत्व आहे. आगदी गल्लीबोळातही ऑस्कर ला गेलेल्या चित्रपटांची चर्चा रंगत असते. मात्र ऑस्कर पुरस्कार नेमकं काय आहे?हा पुरस्कार कोणत्या संस्थेतर्फे का आणि कशासाठी दिला जातो ?याची माहिती फार कमी लोकाना आहे. याविषयी आपण या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत.
               अमेरिकेतील अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अन्ड सायन्स या संस्थेतर्फे हा ऑस्कर पुरस्कार सिनेसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. लुईस बी. मेयर यांनी या संस्थेची स्थापना केली सोबतच ऑस्कर पुरस्कारांचीहि सुरवात केली. पहिला ऑस्कर पुरस्कार ६मे १९२९ रोजी प्रदान करण्यात आला.

                -::::ऑस्कर या पुरस्कारांचे काही नियम खालील प्रमाणे::::-  

                 ****ओस्कर च्या नामांकनासाठी पाठवला जाणारा सिनेमा मागील  वर्षात अर्थातच १  जानेवारी आणि ३१ डिसेंबर या दरम्यान   प्रदर्शित झालेला असेल तरच तो पुरस्कारासाठी ग्राह्य धरला जातो.
                 ****सिनेमा हा कमीत कमी ४० मिनिट किवा त्या पेक्षा अधिक वेळाचा असावा,४० मिनिटा खालील  सिनेमा,माहितीपट ग्राह्य धरला जात नाही.
                 ****सिनेमांची प्रिंट ३५. एमएम आणि ७०. एमएम ची असावी. तसेच पूर्वी २४ फ्रेम/सेकंद किवा ४८फ्रेम/सेकंद असे सिनेमे या नामांकनासाठी पात्र होई कालांतराने या नियमात अमुलाग्र बदल करण्यात आले.
                 ****प्रोग्रेसिव्ह स्कॅन डिजिटल सिनेमा या मापक यंत्रणेनुसार याचे रीझोलुशन १२८०बाय७२० इतके असावे…
                 ****चित्रपट निर्मात्याने दिलेल्या तारखेपर्यंत सर्व नियमांची पूर्तता करून चित्रपट ऑनलाईंन पद्धतीने अकादमीकडे पाठवावा….

                -:::: निवडप्रक्रिया ::::- 

                  ऑस्कर पुरस्कारासाठी विविध विभागासाठी नामांकन संस्थेकडे दाखल झालेले असतात. संस्थेचे सहा हजार सदस्य संख्या आहे. या सहा हजार सदस्यीय समितीचे पुरस्कार निवडीसाठी मतदान घेतले जाते. हे सदस्य दरवर्षी ऑस्करचे  आकर्षक सुवर्ण चषक देण्यासाठी यातील पुरस्कर्ते निष्कर्षाच्या आधारे निवडतात,

                 -::::ऑस्कर पुरस्काराचे स्मृतिचिन्ह ::::-

                 ऑस्कर चषकाचे स्वरूप म्हणजे तो एक लहान पुतळा असतो. हे स्मृतिचिन्ह ब्रिटानिया धात्तू ,तांबे ,निकेल ,चांदी आणि २४ कॅरेट सोने अशा पंचधातुनी बनवण्यात येतो. या पुतळ्याची उंची  १३(१/२)इंच  वजन ८(१/२)पाउंड इतके असते. असे ५० स्मृतीचिन्ह बनवण्यासाठी जवळपास ३ ते ४ आठवड्यांचा    कालावधी लागतो. पंचधातुनी बनवण्यात येणारा हा धातू अतिशय प्रतिष्टेचा  समजला जातो.

           

                -::::ऑस्कर पुरस्कार सिनेसृष्टीत किती व कोणत्या विभागा नुसार दिले जातात  विभाग पुढील प्रमाणे ::::-

            
  • उत्कृष्ट अभिनेता मुख्य भूमिका 1928 पासून 
  • उत्कृष्ट अभिनेता सहाय्यक भूमिका 1936 पासून 
  • उत्कृष्ट अभिनेत्री  मुख्य भूमिका 1928 पासून 
  • उत्कृष्ट अभिनेत्री  सहाय्यक भूमिका 1936पासून 
  • उत्कृष्ट अनिमेटेड सिनेमा 2001पासून 
  • उत्कृष्ट  अनिमेटेड शोर्ट फिल्म    1931पासून 
  • उत्कृष्ट सिनेमेटोग्रफि  1928 पासून 
  • उत्कृष्ट वेशभूषाकार  1948 पासून 
  • उत्कृष्ट दिग्दर्शक  1928 पासून 
  • उत्कृष्ट डॉकुमेंट्री  1943 पासून 
  • उत्कृष्ट सिनेमा संपादन १९३४ पासून 
  • उत्कृष्ट परकीय भाषा सिनेमा  1947 पासून 

आणि इतर …………!




सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पहिले ऑस्कर एमिल जेनिंग्ज तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पहिले ऑस्कर जेनेट गेनर या अभिनेत्रीस मिळाला. 
प्रथम विशेष पुरस्कार वार्नर ब्रदर्स याला जॉझ सिंगर यास चित्रपट निर्मितीसाठी देण्यात आला. तर चार्ल्स चप्लिन यांना दि . सर्कस चित्रपटाच्या निर्मिती,लेखक,अभिनेते यासाठी देण्यात आला. 

प्रथमच मराठी वेशभूषाकार भानू अथ्थया यांना इ.स १९८२ मध्ये गांधी चित्रपटातील वेशभूषा संकल्पनेसाठी ऑस्कर मिळाला होता. 

शुक्रवार, ६ डिसेंबर, २०१३

शेवटी सचिनही माणूसच आहे!

डिसेंबर २०१२ला सचिन तेंडुलकरने एक दिवसीयक्रिकेटमधून निवृत्ती घेतली. हा दिवसतब्बल २२ वर्षं आणि ९१ दिवसांनंतर आला. या प्रदीर्घकाळात हा विक्रमादित्य ४६३ सामने, १८,४२३ धावा, ४९ शतकं, ९६अर्धशतकं, एकदिवसीय सामन्यातीलएकमेव द्विशतक, असे अनेक विक्रम काळाच्या पडद्यावर रेखाटूनगेलाय. सर डॉन ब्रॅडमन ज्याचे प्रशंसक होते,क्रिकेटवेड्या असलेल्या आपल्या देशात ज्याला देव मानलं जातं,ज्याची विकेट मिळवणं हे प्रत्येक गोलंदाजाचं स्वप्नंअसतं आणि ज्याच्या काळाचे साक्षीदारअसल्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे,त्याची निवृत्ती मात्रआपल्याला म्हणावी तेवढी सलली नाही.माध्यमांचा लाडका असलेल्या सचिनबद्दल केवळ दखलघेण्यापलीकडेमाध्यमांनी कसलाही गाजावाजा केला नाही.त्याच्या संघ सहका-यांनाही त्याचा हा निर्णयधक्कादायक वाटला नाही.त्याच्या चाहत्यांनीही त्याला परत येण्याचंआवाहन केलं नाही. कुठे रडण्याचा आवाजआला नाही की उसासे टाकले गेलेनाहीत. ऐकू आले ते फक्त सुटकेचे, समाधानाचे

निःश्वाजस आणि एक कुजबूज, की सचिनचा निर्णययोग्यच आहे पण वेळ चुकली. असं का व्हावं?२०११ साली भारताने विश्वं कप जिंकल्यानंतरच

सचिनच्या निवृत्तीची चर्चा सुरूझाली होती. कारण त्यानंतरचत्याच्या खेळातला डौल कमी होत चालला होता. त्यानेकधी निवृत्ती घ्यावी,का घ्यावी, का न घ्यावी असे सल्ले देणं सुरुझालं होतं. सचिनवर आपण पराकोटीचं प्रेम केलंय हेकबूल करायला कोणालाच संकोच वाटणार नाही.आपल्या अप्रतिम खेळाच्या जोरावर त्यानेगेली तेवीस वर्षंआपल्याला आणि आपल्या देशाला एक आदर मिळवून दिला,हेही कोणी नाकारणार नाही.तो ज्या काळात खेळायला आला त्या काळापासून आजपर्यंतया देशाच्या क्रिकेटमधील प्रत्येकमहत्त्वाच्या घटनेला सचिनचा संदर्भ आहे. ‘टाइम’ साप्ताहिकानेयाचा एका लेखात अचूक उल्लेख केलाय.काय म्हटलंय त्यात?‘ज्या वेळी या ग्रहावरील प्रत्येकव्यक्तीवर काळ आपला प्रभाव गाजवतहोता त्या वेळी त्याने फक्त एकाच माणसाचा अपवादकेला. सचिनसमोर काळही जणू गोठला होता.आपल्याला चॅम्पियन्स मिळालेत, लीजंड्स मिळालेत-मिळतीलही, पण आपल्याला दुसरा सचिनमिळाला नाही, आणि कधीचमिळणारही नाही.ज्या वेळी सचिनपाकिस्तानला आपला पहिला सामना खेळायला गेला त्यावेळी शुमाकरहे नाव फॉर्म्युला-वन रेसशी जुळायचंबाकी होतं. लान्स आर्मस्ट्रॉंग अजून टूरडी फ्रान्सवर गेला नव्हता. पीटसॅम्प्रासने अद्याप एकही ग्रॅन्ड स्लॅम जिंकलेलंनव्हतं. ज्या वेळी सचिन ‘सचिन’ बनतहोता त्या वेळी जगाने रॉजर फेडररचंनावही ऐकलं नव्हतं.लिओनेल मेस्सी अद्याप रांगत होता. उसेन बोल्टजमैकाच्या गल्लीबोळांतून पळणारा एक मुलगा होता.बर्लिनची भिंतपडलेली नव्हती. रशियाचे तुकडे झालेनव्हते. डॉ. मनमोहन सिंग यांनी भारताचं अर्थशास्त्रबदलायचं अजून बाकी होतं.’‘टाइम’चा हा लेख समस्त भारतीयांची मानअभिमानाने ताठ व्हावी असाच आहे, पणत्याची वेळ चुकली. कारण मुळातसचिनचीच वेळ चुकली. त्याचवेळी ‘टाइम’लाही सांगावंसं वाटतं,की भारतीयजनता आता पूर्वीसारखी राहिली नाही.मायकेल शुमाकर यशस्वी होऊन निवृत्त झाला,पुन्हा परतला आणि अपयशी ठरून त्याला जावं लागलं.पीट सॅम्प्रासने योग्य वेळ साधतनिवृत्ती पत्करली. पण, सचिनने यातूनधडा घेतला नाही. त्यामुळेच तो निवृत्त झाल्यावरत्याच्या आजवरच्या कर्तृत्वाला साजेसा निरोप त्याच्या असंख्यचाहत्यांनी त्याला दिला नाही, हे कटू सत्यआहे.माजी फिरकी गोलंदाजइरापल्ली प्रसन्ना म्हणतात,‘सचिनच्या निवृत्तीने आता निवड मंडळाला हायसं वाटलंअसणार. त्याला एकदिवसीय सामन्यातूनवगळण्याची वेळ त्यांच्यावरआली नाही म्हणून त्यांना आनंदझाला असेल. तो खेळतराहिला असता आणि अपयशी ठरला असता तर संघावरचंओझं झाला असता.’ प्रसन्ना हे सारंसचिनच्या निवृत्तीनंतर बोलले तो भाग वेगळा, पणत्यांची ही टीका विक्रमादित्यसचिनसाठी नक्कीच क्लेशदायकहोती. पण, निवड समितीचे प्रमुखसंदीप पाटील यांनी पाकिस्तानदौ-यासाठी संघनिवडीच्या वेळी सचिनला ‘त्याचंसंघातील स्थान त्याने गृहीत धरू नये’,असा जो सौम्य शब्दांत सूचक इशारा दिला तो लक्षात घेता स्पष्टचहोतं, की सचिनला संघातूनवगळण्याची तयारी निवडसमितीने केली होती.या गोष्टीची दबक्या आवाजातझालेली चर्चाही तितकीचखरी होती. त्यामुळेच क्रिकेटचा देवमानल्या गेलेल्या, आपल्या चौकार-षट्कारांमध्ये अचूक टायमिंग साधणा-या आणि संघातील एक विचारी, समंजस,मार्गदर्शक अशी प्रतिमा असलेल्या सचिनचंनिवृत्तीबाबतचं टायमिंग का चुकलं, हा प्रश्नत्याच्या चाहत्यांना, क्रिकेट रसिकांना पडणं स्वाभाविक आहे.सचिनने निवृत्तीसाठी इतका वेळका घेतला आणि अजूनही कसोटीतूननिवृत्ती का घेतली नाही याचंएक कारण त्याचे जाहिरातदार आहेत, असंही सांगितलंजातंय. सचिन आज सतरा कंपन्यांच्या ब्रँडेडवस्तूंच्या जाहिराती करतोय. हा सारा शंभरकोटींच्या घरातला व्यवहार आहे. सचिनचं करारसंपण्याआधीच निवृत्त होणं या कंपन्यांना परवडणारंनाही. त्यामुळे खेळतराहण्यासाठी त्यांचा अप्रत्यक्ष दबाव सचिनवर असूशकतो, असंही काहींचं म्हणणं आहे.अर्थात कोणाचं काहीही म्हणणं असो,सचिनने आपल्या सर्वांना जे आनंदाचे क्षण दिलेत तेकधीच विसरता येणार नाहीत. ‘निवृत्तझाल्यानंतर चाहत्यांच्या मिळालेल्या संदेशाने आपण भारावलोयत,त्याचा आनंद आहे आणि डोळ्यांतपाणीही आहे,’ असं सचिनने म्हटलंय.तो असंही म्हणाला,की ‘एकदिवसीय क्रिकेटमधीलहे जादुई क्षण कायम माझ्यासोबत राहतील.’ तेआपल्याही सोबत राहणार आहेत. पणतरीही त्याच्या जाण्याने आज डोळ्यांतपाणी मात्र तरारलंनाही हेही तेवढंच खरं. कारणया देवाची वेळ चुकली.शेवटी सचिनही माणूसच आहे!

मंगळवार, २२ ऑक्टोबर, २०१३

पोलिस हुतात्मा दिवस






                                            सर्वप्रथम पोलिस हुतात्मा दिनानिमित्त सर्व शहीद पोलिस बांधवाना माझ्या परिवार,मित्रमंडळी आणि तमाम भारत देश बांधवांतर्फे विनम्र अभिवादन…। 



                                            काल २१ ऑक्टोंबर म्हणजेच पोलिस हुतात्मा दिन.२१ ऑक्टोंबर १ ९ ५ ९ ला लद्दाख च्या सीमेवर भारत चीन युध्द झाले होते. तत्कालीन युद्धात आपल्या सी. आर. पि. एफ च्या १० जवानांनी चीनची आख्खी एक बटालियन रोखून धरली चीनी सैन्याला एक इंच सुद्धा आपल्या वतन काबीज करू दिला नाही.आणि त्या युद्धात लढणाऱ्या सर्व जवानांनी आपल्या साठी हौतात्म्य पत्करले… तेव्हापासून २1ऑक्टोंबर हा दिवस पोलिस शहीद दिवस संबोधला जातो.


                                            त्या सैनिकांनी शेवटपर्यंत झुंज दिली,रक्तरंजित युध्द लढले. दुर्दैवाने आज आपल्याला त्याच्या हौतात्म्याचा विसर पडलाआहे . काल वृत्तपत्रात,टीव्ही,फेसबुक इ. सामाजिक माध्यमांवर कुठेच मला पोलिस हुतात्मा दिवस असा उल्लेख आढळला नाही…
                                            एरव्ही तासनतास फेसबुकवर काही बाही फोटो शेअर करणारे अन च्याटिंग करणारे आपण युवक शहीद पोलिसांना ५ मिनिट देखील श्रद्धांजली वाहू शकलो नाही???एवढेच नव्हे तर समाजाचा आरसा,लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मिरवणाऱ्या आपण पत्रकारांनी देखील चार ओळींची बातमी देऊन शब्दसुमनांनी श्रद्धांजली वाहू शकलो नाही तथापि समाजाला देखील स्मरण करून दिले नाही…. पक्षश्रेष्टींच्या वाढदिवसानिमित्त किवा पुत्रांच्या लग्नावर बेसुमार खर्च करणारे ,फलक छापणारे , हजारोंच्या जाहिराती देणाऱ्रे ,मोठमोठ्या सभा आयोजित कंरनारे आपले नेते,लोकप्रतिनिधी एक आर्धा तासाची जाहीर स्मरण सभा आयोजित करू शकले नाहीत…. याशिवाय शाळा महाविद्यालयांमध्ये इतर पार्ट्या साजर्या केल्या जातात मग हुतात्मा दिनच का साजरा केला जाऊनायर नये?????




                               २६/११ च्या हल्ल्यात अन आताच पुंडलिक माने यांनी वीरमरण पत्करले…… या वर्षात ५७६ पोलिस जवान कर्तव्य बजावत असताना धारातीर्थी पडले…… त्या सर्व जवानांच्या शहादतीची किंमत आपल्या सर्वांना कळणे खूप गरजेचे आहे…… काल औरंगाबाद आयुक्तालयात पोलिस हुतात्म्यांना मानवंदना दिली तेव्हाचा फोटो वरती टाकला आहे…


                                शेवटी पुन्हा एकदा शहीद पोलिसांना मनापासून मानवंदना देतो…

              सांगायचं एवढच कि …………


                                     
  ए मेरे वतन के लोगो,
                                        जरा आखो मे भरलो पाणी,
                                        जो शहीद हुवे है उनकी
                                        जरा याद करो कुर्बानी,

                                जरा याद करो कुर्बानी…............……!


शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०१३

लेखणी बोले......


काहीतरी लिहायचे असे खूप दिवसापासून वाटतेय पण काय? कोणत्या? विषयावर भाष्य करायचे हे तर खूप अवघड काम आहे? असे आता वाटू लागले. कारण लेखणी बोलली कि तिच्यावर आक्षेप घ्यायला, तिचे तोंड दाबायला काही लोकं उभे असतात.
 असो, पण सुरवात काय आणि कोणत्या विषयावर करावी असे झाले आहे. अस प्रत्येकाच होत का? माहिती नाही, पण मला अस वाटू लागलं कि प्रत्येक क्षेत्रात पाउल ठेवणाऱ्या व्यक्तीचं असाच होत असणार, नाही समजल तर मग समजावून घेऊ. मी जेव्हा एखादी कथा, चारोळी, कविता, लेख असे जेव्हा वाचतो तेव्हा मला नेहमी वाटत कि मी जर हे लिहील असत तर,
जेव्हा एखादा चित्रपट पाहतो? तेव्हा नेहमी वाटत जर आपण हा चित्रपट लिहिला असता तर. यातली गाणी लिहिली असती तर, काय राव तुम्ही म्हणाल याला वेड-बीड लागलं कि काय. पण खर सांगू मित्रानो,आता मला पत्रकारितेला प्रवेश घेतल्यापासून लिहायलाच खूप आवडतय…. मी हल्ली खूप शांत शांत असतो. कारण आता मला निरीक्षण करायची सवय लागलीय… आणि  केलेलं तेच निरीक्षण कागदावर उतरवण्यासाठी मला माझी लेखणीच फक्त साथ देते फक्त आणि फक्त लेखणीच………………… !